Saturday, February 9, 2019

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शेतकऱयांच्यासाठी एक मह्त्वाचा निर्णय घेतला

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शेतकऱयांच्यासाठी एक मह्त्वाचा  निर्णय घेतला


स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करणारे देशातील एकमेव सरकार म्हणजे, दिल्लीतील आम आदमी पक्षाचे केजरीवाल सरकार.

होय आम आदमी पक्षाच्या सरकारने आज दिल्लीतील शेतकऱ्यांना मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या संपूर्ण शिफारशी स्वीकारून त्या दिल्ली मधे लागू करणार असल्याची घोषणा केजरीवाल सरकार तर्फे करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणारे केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री असून दिल्ली हे पहिले राज्य ठरले आहे.

आजवर प्रत्येक पक्षाने निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांची मते आपल्या पदरात पाडण्यासाठी अनेक आश्वासने आणि घोषणा केल्या पण त्याची अंमलबजावणी मात्र कोणी केली नाही. त्यापैकी एक असलेले आश्वासन म्हणजे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, पण देशातील शेतकऱ्यांचे दुर्दैव की अद्याप कोणत्याही सरकारने हे आश्वासन पूर्ण केले नाही. मात्र दिल्लीतील केजरीवाल यांच्या सरकारने आज हा निर्णय घेवून देशभरातील शेतकऱ्यांचा आशा पल्लवित केल्या आहेत.

हा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकार अभिनंदनास पात्र आहेत.

No comments:

Post a Comment

काही महत्वाच्या SITE

कोपीराईट फ्री IMAGES pexels.com/ ALL HEALTH RELATED DATAILS दुनिया च्या महाग वस्तु luxhabitat.ae KNOWLAGE SITE hindigyanbook.com/ BIOGR...